ते म्हणतात
आम्हीच...
राममंदीर बांधणार
रामाच्या नावाखाली
इथे लक्ष्मणच..
भरताला मारणार
मानवतारुपी सीता
पुन्हा-पुन्हा..
भुमीत सामावणार.
कारण.....
कितीदाही
अनुभव घेतला
तरी मायेचा सुवर्णमृग,
तिला पुन्हा-पुन्हा
मोहात पाडणार.
आयुष्याचा एक एक टप्पा मागे टाकताना, जे काही मागे राहिलंय ते पुन्हा पुन्हा आठवावंसं वाटत राहतं. .................................................................................... विशाल विजय कुलकर्णी
No comments:
Post a Comment